पुणे, दि. ३ “पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर या एक महान प्रशासक, आदर्श व नीतिमान राज्यकर्त्या होत्या. त्यांचे जीवन म्हणजे त्याग, सेवा आणि जनहिताचा आदर्श आहे. ‘शासन म्हणजे जनतेची सेवा’ या तत्वावर आधारित त्यांचे कार्य लोककल्याणकारी असेच होते,” असे मत सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनचे संस्थापक व अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया (Founder and Chairman of Suryadutt Education Foundation Prof. Dr. Sanjay B. Chordia ) यांनी व्यक्त केले. देश व समाजाच्या हिताचे कार्य अविरतपणे करण्याचा कानमंत्र त्यांच्या व्यक्तित्व व कार्यातून आपल्याला मिळतो, लवकरच अहिल्याबाई होळकर यांच्या नावाने सूर्यदत्त संस्थेत अध्यासन स्थापन करण्यात येणार आहे, असेही त्यांनी नमूद केले.
सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची ३००वी जयंती श्रद्धापूर्वक व उत्साहात साजरी (Suryadatta Group of Institutes celebrates the 300th birth anniversary of Punyashloka Ahilyabai Holkar with devotion and enthusiasm ) करण्यात आली. ‘सूर्यदत्त’च्या बावधन कॅम्पसमध्ये आयोजित कार्यक्रमात सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनच्या उपाध्यक्ष सुषमा चोरडिया, सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे मुख्य कार्यपालन अधिकारी अक्षित कुशल, अधिष्ठाता प्रा. डॉ. प्रतीक्षा वाबळे, संचालक प्रशांत पितालिया यांच्यासह सर्व विभागाचे संचालक, प्राचार्य, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया व सुषमा चोरडिया यांच्या हस्ते अहिल्याबाईंच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला.
(Prof. Dr. Sanjay B. Chordia said) प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया म्हणाले, “अहिल्याबाई होळकर यांच्या कार्यकाळात गरीब, वंचित आणि महिलांसाठी अनेक लोककल्याणकारी योजना राबवण्यात आल्या. त्यांनी शेतकरी, कारागीर व छोट्या उद्योजकांसाठी रोजगारवृद्धी, वनोपजांवर आधारित कुटीर उद्योग, हस्तकला आणि जलव्यवस्थापन योजना राबवल्या. लहान कालव्यांचे जाळे उभारून शेतीस चालना दिली आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळ दिले. हिंदू देवदेवतांची मंदिरे, श्रद्धास्थाने सुरक्षित केली. अनेक शक्तिस्थळांचा जीर्णोद्धार केला. अहिल्याबाई होळकर यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन सूर्यदत्त परिवाराने परिसरातील गावांशी सातत्याने विविध उपक्रमांची जोड दिली आहे. त्यांच्या नीतीमुल्याना सामोरे ठेवून संस्था कार्यरत आहे.”
सुषमा चोरडिया म्हणाल्या, “अडीचशे वर्षांपूर्वी अहिल्याबाईंनी देशात नारीसुरक्षा दलाची संकल्पना मांडून महिला सक्षमीकरणाच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले होते. त्या काळात त्यांनी महिलांसाठी सुरक्षितता, शिक्षण आणि उद्योग यांचा विचार केला होता, जो आजही आधुनिक समाजासाठी प्रेरणादायी आहे. सूर्यदत्त वूमन एम्पॉवरमेंट लीडरशिप अकॅडमीचे कार्य त्यांच्याच प्रेरणेतून सुरु आहे.”
जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात अहिल्याबाईंच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या नीतीमूल्यांचा आजच्या काळातील समाजासाठी उपयोग कसा करता येईल, तसेच व्यवस्थापनाच्या दृष्टिकोनातून त्या काळातील त्यांचे व्यवस्थापन जगाला मार्गदर्शक ठरू शकेल असे होते, असे मनोगत प्रा. डॉ. प्रतीक्षा वाबळे यांनी व्यक्त केले. प्रशांत पितालिया यांनी सूत्रसंचालन केले.